महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, चांदवड च्या अधिकृत वेबसाईटवर आपले स्वागत आहे.     |     IMPS / NEFT / RTGS: जलद पैसे पाठवण्याची सुविधा.     |     सामान्य माणसाच्या उन्नत जीवनासाठी, पतसंस्था सदैव तत्पर तुमच्यासाठी...

पतसंस्थेबद्दल

सभासदांच्या सर्वांगीण विकासासाठी समाजाने सन २००१ मध्ये हे छोटेसे रोपटे लावले होते. शिस्तबद्ध, पारदर्शी व प्रामाणिक प्रशासनामुळे आज त्याचे कल्पवृक्षात रूपांतर झाले आहे. पतसंस्थेच्या २५ वर्षाच्या आर्थिक वाटचालीमध्ये संस्थेने सातत्याने दैदिप्यमान व गौरवास्पद कार्य केलेले आहे. स्थापनेपासून पतसंस्थेला सलग वाढता नफा, सलग वाढत्या ठेवी, सतत उच्चत्तम ऑडीट गुण व न्युनत्तम थकबाकी आहे. २५ वर्षांपैकी ६ वर्ष 'अ स्टार' तर १९ वर्ष 'अ' ऑडीट वर्ग असलेली आहे. चांदवड तालुक्यातील ही अग्रगण्य असलेली पतसंस्था म्हणून नाव लौकीक आहे. पतसंस्थेचे भव्य कार्यालय असून ते स्वमालकीचे, अद्ययावत व वातानुकूलीत असे आहे.

सभासद केंद्र स्थानी मानून सकारात्मक व सुसंवाद साधून अर्थकारण केल्यामुळे संस्थेच्या कार्याची व्याप्ती वाढली आहे. संस्थेमुळे सभासदांचे आर्थिक जीवन उन्नत झालेले असून त्यांचे आर्थिक परिवर्तन झाले आहे. सर्व सभासदांना प्रत्येकी १ लाख रूपये मुल्याचा सरकारी विमा कंपनीचा विमा संरक्षण कवच म्हणून काढला जातो. गेली २५ वर्षापासून अविरोध संचालक मंडळाची परंपरा कायम टिकून आहे. सभासदांना ई-सेवेमार्फत एन.एफ.टी. (NEFT), आर.टी.जी.एस. (RTGS), नेट बँकिंग, एस.एम.एस. (SMS) द्वारे ग्राहकांना सर्व खात्यांची थेट माहिती मिळते. गेली अनेक वर्षापासून संस्थेचा निव्वळ एन.पी.ए. (NPA) शुन्य टक्के आहे हि भूषणावह बाब आहे. संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांना पी.एफ., सेवा नियमावली लागू असून दरवर्षी बोनस दिला जातो. संस्थेचे संस्थापक प्रा. निकम टी.पी. हे पूर्ण वेळ संस्थेत बसून आर्थिक व्यवहार बघतात. त्यामुळे संस्थेचे गुणात्मक कामकाज उत्कृष्ट असून दरवर्षी आर्थिक प्रगतीचा आलेख चढता आहे. चांदवड तालुक्यात अनेक नामांकित पतसंस्था आहे, त्यांच्याशी निर्मळपणे स्पर्धा करून, दुष्काळ, आर्थिक मंदी, गारपीट, नोटाबंदी, कोरोना अशा अनेक संकटांना सामोरी जावून संस्थेने उत्कृष्ट कर्ज वसुली व गुणवत्ता राखलेली आहे.

About Us

संस्थेच्या स्थापनेचा हेतु

  • सतत अवर्षणग्रस्त असलेल्या चांदवड तालुक्यातील लोकांना खाजगी सावकारांपासून मुक्त करण्यासाठी व लोकांचे कौटुंबिक, आर्थिक जीवन उन्नत होण्यासाठी प्रा. निकम टी.पी. व त्यांच्या सहकाऱ्यांनी 'महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्था मर्या. चांदवड' या नवीन पतसंस्थेची सन २००१ रोजी स्थापना केली.
  • त्वरीत, सुलभ व पारदर्शी पध्दतीने आर्थिक मदत करून लोकांच्या जीवनात परिवर्तन घडून आणणे.
  • चांदवड तालुक्यातील बेरोजगार तरुणांना अर्थ सहाय्य करून त्यांना रोजगार उपलब्ध करून विकासाच्या प्रवाहात आणणे.
  • कष्टकरी शेतकरी, स्त्रियांना आर्थिक मदत करून त्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देणे.
  • समाजातील गरीब, गरजू, होतकरू लोकांना कर्जपुरवठा करून त्यांचा आर्थिक विकास घडवून आणणे.
  • लोकांना आर्थिक बचतीची सवय लावणे.
  • लोकांमध्ये "सहकारातुन समृद्धीची" जाणीव निर्माण करणे.
  • ग्राहकांच्या सर्वांगीण विकासाबरोबर संस्थेचा विकास व आर्थिक स्थैर्य मिळविणे.
  • शासनाचे व नियामक मंडळाच्या नियमांचे, उपविधीचे पालन करून संस्थेचे कामकाज करणे.

संस्था स्थापनेची पार्श्वभूमी

"सहकारातून समृद्धी" हे तत्त्व डोळ्यासमोर ठेवून संस्थेचे संस्थापक प्रा. निकम टी. पी. यांनी संस्था सुरू केली. दिनांक २९/०५/२००१ रोजी आपल्या मित्र परिवाराबरोबर "महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्था मर्या. चांदवड" या नावाने पतसंस्थेची स्थापना केली.

चांदवड तालुक्यातील सततच्या नैसर्गिक संकटांमूळे शेतकरी वर्ग, मजूर, कामगार, कारागिर हे सर्व कर्जात व सावकारांच्या दुष्ट चक्रात अडकलेले होते. त्यांचे हे आर्थिक शोषण थांबविण्यासाठी संस्थेची नोंदणी केली. सभासदाकडून फक्त १०० रुपये भाग रक्कम घेवून पतसंस्था सुरु केली. आज रोजी संस्थेचे ३ कोटी २७ लाख रुपये भागभांडवल आहे व खेळते भागभांडवल १२ लाख १९ हजार होते ते आज १४ कोटी ८६ लाख रूपये आहे.

Background Image

व्हिजन व मिशन

व्हिजन

  • सभासदांचे आर्थिक सक्षमीकरण व स्वावलंबीकरण करणे.
  • सभासदांना प्रामाणिक, पारदर्शक, विश्वासार्ह, त्वरीत आर्थिक सेवा देणे.
  • बचत, काटकसर व गुंतवणूक संस्कृती वाढविणे / सवय लावणे.
  • सुलभ, त्वरीत, कमी व्याजदरात, कमी अटी-शर्तीवर कर्ज सुविधा उपलब्ध करून देणे.
  • तंत्रज्ञानाचा वापर - आधुनिक ई बँकिंग सुविधा व डिजिटल सेवा देवून कार्यक्षमता वाढविणे.
  • स्थानिक विकासाला चालना - ग्रामिण व शहरी भागातील आर्थिक व सामाजिक विकासाला गती देणे.
  • सहकार तत्त्वांचा प्रसार - सहकार, समानता, परस्पर सहाय्य करणे, सहकारातून समृद्धी या हि मुल्य समाजात रुजविणे व त्या तत्त्वाप्रमाणे कार्य करणे.
  • शेतकरी व व्यापारी वर्गासाठी वेअरहाऊस बांधणे.
  • महिलांच्या सबलीकरणासाठी स्वयंरोजगारातुन स्वावलंबी बनविणे.

मिशन

  • स्वयंरोजगारातून आत्मनिर्भर, स्वावलंबी बनविणे.
  • स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणे.
  • गरजू, होतकरू शेतकरी, व्यवसायीक, लहान-मोठे उद्योजक, कारागीर यांना कमी व्याजदरात, पारदर्शी पध्दतीने अर्थ सहाय्य करणे.
  • ग्रामीण भागातील तरुण, महिला, शेतकरी यांच्यासाठी सहकाराच्या माध्यमातुन ॲग्रीकल्चर क्रेडीट सोसायटी स्थापन करून त्यांना आर्थिक सक्षम करणे.
  • ग्रामीण भागातील कृषी आधारीत फुड प्रोसेस व्यवसायाला चालना देवून आर्थिक विकास करणे.

वाढते यश वाढता विश्वास, विकासाचा ध्यास हाच श्वास...